काय आहे ग्राम समृद्धी योजना? ग्रामविकासासाठी १.८८ लाख कोटी; मनरेगासाठी ८६ हजार कोटी ग्रामीण विकास मंत्रालय
राष्ट्रीय

काय आहे ग्राम समृद्धी योजना? ग्रामविकासासाठी १.८८ लाख कोटी; मनरेगासाठी ८६ हजार कोटी

या अर्थसंकल्पात ग्रामविकास खात्यासाठी १.८८ लाख कोटींची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या खात्याच्या तरतुदीत ५.७५ टक्के वाढ झाली. तर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात केली जाणा आहे. जाणून घ्या काय आहे ग्राम समृद्धी योजना...

Swapnil S

या अर्थसंकल्पात ग्रामविकास खात्यासाठी १.८८ लाख कोटींची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या खात्याच्या तरतुदीत ५.७५ टक्के वाढ झाली.

ग्रामविकास खात्यासाठी १,७७,५६६.१९ कोटींची तरतूद केली आहे. तर ग्रामीण विभागात रोजगाराची हमी देणारी ‘मनरेगा’ योजनेसाठी ८६ हजार कोटींची तरतूद केली. २०२३-२४ मध्ये ‘मनरेगा’साठी ६० हजार कोटींची तरतूद केली होती. ‘मनरेगा’ योजनेत १०० दिवसांचा रोजगार ग्रामीण भागात दिला जातो. कोविड काळात ‘मनरेगा’ ही योजना ग्रामीण भागात लोकप्रिय ठरली होती. या योजनेने ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण केला.

ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात

राज्यांच्या भागीदारीत सर्वसमावेशक बहु-क्षेत्रीय 'ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता' योजना सुरू केली जाणार आहे. यात शेती क्षेत्रातील कौशल्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या संधी उपलब्ध केल्या जातील. ग्रामीण भागातील महिला, तरुण शेतकरी, तरुण, लहान शेतकरी व भूमिहीन कुटुंबांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंह म्हणाले की, दारिद्र्यमुक्त गावाद्वारे दारिद्र्यमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण केले जाईल. 'ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता' योजनेत महिला, तरुण शेतकरी, तरुण, लहान शेतकरी व भूमिहीन कुटुंबांना एकत्रित केले जाईल. ग्रामीण भागातून दारिद्र्य हटवण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटी रुपयांची तर दीनदयाळ अंत्योदय योजनेत १९००५ कोटींची तरतूद केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी