राष्ट्रीय

यमुना पुन्हा धोक्याच्या पातळीबाहेर

जनतेने यमुनेच्या किनारी येऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीबाहेर वाहू लागल्याने दिल्लीकर हादरले आहेत. दरम्यान, येते सहा दिवस दिल्लीत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दिल्लीतील जुना यमुना पुलावर पाण्याची पातळी २०५.७५ मीटर होती, तर यमुनेची धोक्याची पातळी २०५.३३ मीटर आहे.

हरियाणाच्या हथिनीकुंड धरणातून यमुना नदीत लाखो क्युसेस पाणी सोडण्यात आले. त्यामुळे दिल्लीत पुराचे सावट पसरले आहे. अधिकारी व जनता यामुळे घाबरली आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणात ॲलर्ट घोषित केला आहे. तीन सरकारनी यमुनेच्या सर्व चौक्यांवर टेहळणी वाढवली आहे. विशेषत: दिल्लीत मोठा धोका आहे. कारण दिल्लीत अनेक भाग हे सखल आहेत. पाण्याची पातळी वाढताच ते पाणी शहरात घुसते. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातून लोक अजूनही बाहेर आलेले नाहीत. त्यात पुन्हा पाणी भरू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जनतेने यमुनेच्या किनारी येऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शहरात बोटीतून गस्त घातली जात आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप