उरण परिसरात पावसाळी आजारांचा ‘ताप’; डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत वाढ 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

उरण परिसरात पावसाळी आजारांचा ‘ताप’; डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत वाढ

उरण परिसरात पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, काविळ आणि डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

Swapnil S

उरण : उरण परिसरात पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, काविळ आणि डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदा या आजारांचे रुग्ण दुपटीने वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

बेलपाडा गावात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उरण परिसरात पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

उरण परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा दूषित होत असल्याने तसेच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आजारांना पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी आंदोलन; गोंदेफाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग एकाच वेळी रोखणार

Bhiwandi : गर्भवतीची रिक्षातच प्रसूती; रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Thane : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी

Mumbai : पालिका रुग्णालयात एनआयसीयू बेड्सची गरज; प्रत्यक्षात ३०० बेड्स; स्थायी समितीत सदस्य संतप्त