नवी मुंबई

चांगल्या पावसामुळे भाज्या झाल्या स्वस्त ;एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात पुरवठा

अमित श्रीवास्तव

चांगल्या पावसामुळे भाज्या स्वस्त झाल्या असून एपीएमसी बाजारात त्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घाऊक व किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव उतरले आहे. काही भाज्या ४० रुपये किलो दराने मिळत असल्याचे दिसून येते.गेले १५ दिवस पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना एपीएमसी बाजारात भाज्या आणण्यासाठी वेळ मिळाला. ११ ऑगस्ट रोजी ५९६ भाज्यांच्या गाड्या एपीएमसी बाजारात आल्या. १५ दिवसात पहिल्यांदाच भाज्यांचा एवढा मोठा पुरवठा बाजारात झाला आहे.त्यामुळे बहुतांशी भाज्यांची किंमती कमी झाल्या आहेत, असे एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.फ्लॉवर ४० ते ५० रुपये (कि.), शेवग्याच्या शेंगा ८० रुपये, वांगी ३० ते ४० रुपये (कि.), सिमला मिरची ४० रुपये (कि.) , गाजर ४० ते ५० रुपये (कि.), हिरवा वाटाणा १२० रुपये (कि.), पालकची जुडी १० ते १५ रुपयाने उपलब्ध आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम