क्रीडा

बांगलादेशने श्रीलंकेला ४ गडी, ५८ चेंडू राखून चारली धूळ; एकदिवसीय मालिकाही खिशात

कन्कशन (बदली खेळाडू) म्हणून आलेल्या तांजिद हसनने (८१ चेंडूंत ८४ धावा) साकारलेल्या अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने...

Swapnil S

चट्टोग्राम : कन्कशन (बदली खेळाडू) म्हणून आलेल्या तांजिद हसनने (८१ चेंडूंत ८४ धावा) साकारलेल्या अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला ४ गडी आणि ५८ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह बांगलादेशने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ५० षटकांत २३५ धावांत गारद झाला. तस्किन अहमदने ३, तर मुस्तफिझूर रहमान व मेहदी हसन मिराजने प्रत्येकी दोन बळी मिळवले. जनिथ लियांगेने १०२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०१ धावांची दमदार खेळी साकारली. रहमान जायबंदी झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. तसेच सौम्य सरकारला डोक्याला दुखापत झाल्याने हसन मैदानावर आला.

त्यानंतर हसनच्या अर्धशतकाला रिशाद होसेन (१८ चेंडूंत नाबाद ४८) आणि मुशफिकूर रहिम (नाबाद ३७) यांच्या योगदानाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे बांगलादेशने २३६ धावांचे लक्ष्य ४०.२ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. रिशाद होसेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकेत सर्वाधिक १६३ धावा करणारा नजमूल होसेन शांतो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. जेतेपदाचा चषक स्वीकारल्यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी टाईम-आऊटची नकल करून श्रीलंकेला टोला लगावला.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी