क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना वानखेडेवर?

नवशक्ती Web Desk

कराची : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकदिवसीय विश्वचषकात होणारा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी अहमदाबादमध्ये एकही लढत खेळण्यास नकार दर्शवला आहे. त्यांनी मुंबईतील वानखेडे, कोलकातामधील ईडन गार्डन्स आणि बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी या तीन स्टेडियमचे पर्याय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सुचवले आहेत.

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार असून नियोजित वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणे अपेक्षित आहे. मात्र सेठी यांनी पाकिस्तानचा संघ अहमदाबाद येथे एकही लढत खेळणार नाही, अशी भूमिका स्वीकारली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी आयसीसीच्या ग्रेग बार्कले यांना दिले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे सेठी यांनी मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू असे काही पर्याय आयसीसीला सुचवले आहेत. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सामना प्रामुख्याने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल, असे अपेक्षित आहे.

सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच समावेश

पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पाकिस्तानचा संघ विश्वचषकात सहभागी होईल, असेही सेठी यांनी नमूद केले. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान होणाऱ्या आशिया चषकातून भारतासह अन्य संघांनी माघार घेणार असल्याचे सांगितल्यानंतर पाकिस्तानने विश्वचषकात न खेळण्याचे ठरवले होते. मात्र याविषयी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर