क्रीडा

भारताने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा - रवी शास्त्री यांचे मत

वृत्तसंस्था

भारताने विशेषत: फलंदाजीत आपला आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे मत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे. काही सामने गमवावे लागले, तरी सामने जिंकण्यास एकदा का सुरुवात झाली की, आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या सामन्यांमध्ये उपयुक्त ठरतो.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले फोन बंद करावेत, असा सल्ला शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. शास्त्री म्हणाले की, त्याने आपल्या मेहनतीवर अवलंबून राहावे, सामन्यात कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान दुबईतील याच मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता.

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा