क्रीडा

भारताने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा - रवी शास्त्री यांचे मत

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे

वृत्तसंस्था

भारताने विशेषत: फलंदाजीत आपला आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे मत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे. काही सामने गमवावे लागले, तरी सामने जिंकण्यास एकदा का सुरुवात झाली की, आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या सामन्यांमध्ये उपयुक्त ठरतो.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले फोन बंद करावेत, असा सल्ला शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. शास्त्री म्हणाले की, त्याने आपल्या मेहनतीवर अवलंबून राहावे, सामन्यात कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान दुबईतील याच मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल