क्रीडा

भारताने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा - रवी शास्त्री यांचे मत

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे

वृत्तसंस्था

भारताने विशेषत: फलंदाजीत आपला आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे मत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे. काही सामने गमवावे लागले, तरी सामने जिंकण्यास एकदा का सुरुवात झाली की, आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या सामन्यांमध्ये उपयुक्त ठरतो.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले फोन बंद करावेत, असा सल्ला शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. शास्त्री म्हणाले की, त्याने आपल्या मेहनतीवर अवलंबून राहावे, सामन्यात कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान दुबईतील याच मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत