@BCCI
@BCCI
क्रीडा

IND vs BAN Test : भारताची बांगलादेशवर मात; जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँईट टेबलवर झाला 'असा' परिणाम

प्रतिनिधी

भारताने (IND vs BAN Test) दुसऱ्या कसोटीमध्ये बांगलादेशवर ३ विकेट्सनी विजय मिळवला. यावेळी आर अश्विन आणि श्रेयस अय्यरने केलेली ७१ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला १०० धावांची गरज होती. पण भारताची अवस्था ४५ वर ४ बाद अशी होती. त्यानंतरही भारताने ३ झटपट विकेट्स गमावत ७४ वर ७ अशी परिस्थिती झाली होती. (WTC 2023)

मात्र, अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. अश्विनने ४२ तर अय्यरने नाबाद २९ धावांची खेळी केली. मेहंदी हसनने ५ विकेट्स घेतल्या तर कर्णधार शकिब उल हसनने २ विकेट्स घेतल्या.

आर अश्विनने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीर सन्मानित करण्यात आले.

भारताच्या या मालिका विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी भरारी घेतली असून अंतिम सामन्यात जाण्याचा अशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय संघ हा ९९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, १२० गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.

भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकादेखील ७२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिकेमध्ये भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला

अटक, कोठडी बेकायदेशीर! 'न्यूजक्लिक'च्या संस्थापकांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश