क्रीडा

हा विक्रम करणारा जयस्वाल ठरला चौथा फलंदाज

तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले

वृत्तसंस्था

मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामन्यामध्ये  युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करून सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडले. जयस्वालने यूपी विरुद्ध उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत शतक झळकावले.

रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन डावात शतक झळकावणारा जयस्वाल आता मुंबईचा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वसीम जाफर या मान्यवरांच्या यादीत तो सामील झाला आहे. रणजी करंडक उपांत्य फेरीच्या तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफर ने देखील शानदार शतक केले. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

रेस्टॉरंटमध्ये खराब जेवण मिळालं? FSSAI कडे काही मिनिटांत करा तक्रार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Mumbai : पायधुणीत ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Thane : दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला वाढदिवसाचा बॅनर; Video व्हायरल

Pune : जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर; राज्य सरकारची घोषणा

Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video