क्रीडा

हा विक्रम करणारा जयस्वाल ठरला चौथा फलंदाज

तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले

वृत्तसंस्था

मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामन्यामध्ये  युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करून सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडले. जयस्वालने यूपी विरुद्ध उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत शतक झळकावले.

रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन डावात शतक झळकावणारा जयस्वाल आता मुंबईचा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वसीम जाफर या मान्यवरांच्या यादीत तो सामील झाला आहे. रणजी करंडक उपांत्य फेरीच्या तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफर ने देखील शानदार शतक केले. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव