प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामासाठी स्वातंत्र्यदिनी लिलाव 
क्रीडा

Pro Kabaddi : प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामासाठी स्वातंत्र्यदिनी लिलाव; पवन सेहरावत, प्रदीप नरवाल रिंगणात उतरणार

Swapnil S

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ११व्या पर्वासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया १५ व १६ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या हंगामासाठी पवन सेहरावत, प्रदीप नरवाल असे तारांकित कबड्डीपटू पुन्हा लिलावाच्या रिंगणात उतरतील. तर पुणेरी पलटणचा अस्लम इनामदार, दबंग दिल्लीचा नवीन कुमार यांसारख्या युवा ताऱ्यांना त्यांच्या संघानी कायम राखले आहे.

एलिट रिटेन्ड प्लेयर्स (ईआरपी) श्रेणीतील २२ खेळाडू, रिटेन्ड यंग प्लेयर्स (आरवायपी) श्रेणीतील २६ खेळाडू आणि विद्यमान नवीन तरुण खेळाडू (ईएनवायपी) मधील ४०खेळाडू अशा एकूण ८८ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले. कायम न राहिलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत, परदीप नरवाल, मनिंदर सिंग, फझल अत्राचली आणि मोहम्मद रेझा शादलुई चियानेह यांसारख्या 'स्टार' खेळाडूंचा समावेश आहे, ते मुंबईत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नशीब आजमावणार आहेत.

पीकेएल ११च्या लिलावात देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी केली जाणार आहे: अ, ब, क आणि ड श्रेणीतील खेळाडूंची अष्टपैलू, बचावपटू आणि चढाईपटू अशी उपविभागणी केली जाणार आहे. अ-श्रेणीतील खेळाडूंची किंमत ३० लाख, ब-गटातील २० लाख, क-श्रेणीतील खेळाडूंची १३ लाख, तर ड-गटातील खेळाडूंची ९ लाख असेल. ११व्या पर्वातील खेळाडूंच्या पूलमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या दोन अंतिम फेरीतील २४ खेळाडूंसह ५०० हून अधिक खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघासाठी एकूण पाच कोटी रुपयांची मर्यादा असणार आहे.

२०१४पासून सुरू झालेल्या प्रो कबड्डीचे आतापर्यंत १० हंगाम झाले आहेत. त्यांपैकी गेल्या हंगामात पुणेरी पलटणने विजेतेपद पटकावले. पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असून सध्या लिलावची उत्सुकता आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला