क्रीडा

सामना सुरू होण्यासाठी काही तास बाकी असताना भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

प्रतिनिधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आज मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिला टी-२० सामना मुंबईत होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी काही तास बाकी असताना भारतीय संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने संघात सध्याच्या सर्वात घातक गोलंदाजाची निवड केली आहे. 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केला आहे. 10, 12 आणि 15 जानेवारी दरम्यान दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेत सामने खेळले जातील.
पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून संघातून बाहेर होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकालाही तो मुकला होता. बुमराहला एनसीएने फिट घोषित केले केल्याने आता तो वनडे मालिकेसाठी संघात असेल.

मुंबईत आज ‘टी-ट्वेन्टी’; हार्दिकची ‘कसोटी’

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग