आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफालीची पुन्हा चमक; भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक X | BCCIWomen
क्रीडा

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफालीची पुन्हा चमक; भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक

सलामीवीर शफाली वर्माच्या ४० चेंडूंतील धडाकेबाज ६४ धावांच्या जोरावर भारताने गुरुवारी रात्री बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

Swapnil S

दुबई : सलामीवीर शफाली वर्माच्या ४० चेंडूंतील धडाकेबाज ६४ धावांच्या जोरावर भारताने गुरुवारी रात्री बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

मंद गतीच्या खेळपट्टीवर इतर फलंदाजांना धावा करताना अडचणी येत असताना शेफालीने मैदानाभोवती उत्कृष्ट फटकेबाजी करत भारताला ५ बाद १४९ धावांपर्यंत पोहोचवले. बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी शेफालीचे तीन सोपे झेल सोडले, ज्याचा पुरेपूर फायदा तिने उठवला.

१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकांत ७ बाद १०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. बांगलादेशकडून फेरदौसने १४ तर दिलारा अक्तेरने २१ धावा करत आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघीही सीमारेषेजवळ बाद झाल्या. अक्तेरचा झेल क्रांती गौडने धावत जाऊन अतिशय सुरेख टिपला. भारतीय गोलंदाजांनी फिरकीला अनुकूल असलेल्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला. दीप्ती शर्माने २६ धावांत ३ बळी घेतले, तर श्री चरणीने १४ धावांत १ आणि प्रेमा रावतने २१ धावांत १ बळी घेत बांगलादेशला रोखले.

यापूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने २८ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या. तिने सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर अखेरच्या षटकांत दोन षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या प्रतीका रावलने २० आणि रिचा घोषने २१ धावांचे योगदान दिले. शेफालीने आपल्या खेळीत तीन षटकार मारताना १६० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. बांगलादेशने एकूण चार झेल सोडल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

सात वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तान किंवा श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी पडेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा