ठाणे

टाकाऊ निर्माल्यापासून बायोगॅस व खतनिर्मिती

निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदेतेतर्फे करण्यात आले होते

वृत्तसंस्था

उरण परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्थीच्या काळात गणपती विसर्जन ठिकाणी गणपती विसर्जनासाठी भक्तांनी सोबत आणलेले निर्माल्य तलावात न टाकता निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. उरण नगरपरिषदेने विमला तलाव आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खताची निर्मिती केली आहे.

जल,नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोताचे संवर्धन व सर्व्रेक्षण व्हावे ,तलावातील पाण्याचे प्रदूषण होवू नये हा उद्देश ठेउनच निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदेतेतर्फे करण्यात आले होते.

जेणे करून जमा केलेल्या निर्माल्यापासून बायो गॅस व खत निर्मिती केली जाईल अशी प्रतिक्रिया उरण नगरपरिषदेचे मुखाधिकारी संतोष माळी यांनी व्यक्त केली. या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी.

उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, कनिष्ठ अभियंता झुंबर माने व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक