ठाणे

उल्हासनगरमध्ये साफसफाई अभियान

हे अभियान शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले.

Swapnil S

उल्हासनगर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्हासनगरात कल्याण बदलापूर रस्त्यावरील साईबाबा मंदिर ते फार्व्हर लाईनपर्यंत हे डीप क्लीन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहरांतील राजकीय नेते, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धूळ, फूट पाथवरील कचरा आणि जंगली झाडे उचलण्यात आली आहेत. तसेच पाण्याच्या टँकरने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आली. शहरात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावरही महापालिका उपाययोजना करत असल्याचे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. या स्वच्छता अभियानात कोणार्क कंपनीचे ३०० पेक्षा अधिक कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. हे अभियान शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले.

आता जनगणना 'तुमच्या' हातात! देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना; मोबाईलवरच माहिती भरण्याची नवी सुविधा

वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा इशारा! ४ एप्रिलपासून आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात कधी पाणी बंद? जाणून घ्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?