ठाणे

परतीच्या पावसामुळे वीटभट्टी मजुरांची आर्थिक कोंडी

परतीच्या पावसामुळे तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय लांबला आहे,त्यामुळे येथील मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत.

प्रतिनिधी

जव्हार तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष संघटनेकडून मतदाराला आमिष दाखवण्याकरिता गुपचूप जेवणावळी सुरू झाल्या आहेत. प्रचाराला देखील जोमाने सुरुवात झाली आहे. ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ तारखेला होणार असल्याने प्रत्येक गाव-पाड्यात निवडणुकीचा अगदी धुराळा उडाला आहे. मात्र निवडणूक संपल्यावर रोजगाराचे काय? असा प्रश्न मजुरांना सतावत आहे.

दिवाळीपूर्वी वीटभट्टी वर मजुरीचे काम करून चार पैसे जमवून दिवाळी सण साजरा करण्याचा उद्देश ठेवणाऱ्या मजुरांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय लांबला आहे,त्यामुळे येथील मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत.

तालुक्यात काही दिवसांपासून एकीकडे परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होईल की काय, या चिंतेत शेती व्यावसायिक आहेत तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे वीट व्यवसाय लांबणीवर पडत असल्यामुळे वीट व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज विजांच्या कडकडाटासह एक-दोन तास पाऊस कोसळत आहे.पावसामुळे हळव्या वाणातील काही भातपिकांची कापणी करता येऊ शकत नाही. त्यामुळे ती कापणी हंगामातूनच निघून चालली आहेत. भाताच्या लोंब्या शेतातच गळून जात आहेत.

साधारणतः वीट उत्पादक दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. हा पाऊस असाच सलग आठ दिवस सुरू राहिला तर दिवाळीच्या मुहूर्तावर वीट व्यवसाय सुरू करता येणार नसल्याची नाराजी वीट व्यावसायिकांसोबत मजुरांमध्ये पसरली आहे.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी