ठाणे

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याची आ.राजेश पाटील यांची मागणी

बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे

प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ मधील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे, साचलेले पाणी, गाळ काढण्याचे काम त्वरित करा अन्यथा टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे. सदर पत्रात त्यांनी नमूद केले आहे की मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ हा पालघर जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणारा एकमेव महामार्ग आहे.

या महामार्गाला पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, विक्रमगड, तलासरी ही महत्त्वाची तालुके जोडलेली असल्याने बहुतांश नागरिक हे या मार्गावरून वसई- विरार शहर, मुंबई शहर, शहर, गुजरात या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येजा करीत असतात. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

तसेच महामार्गाच्या डिव्हायडर लगत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन मृत्यु झाला आहे.

Mumbai : ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज होणार इतिहासजमा; आज मध्यरात्री अंतिम पाडकाम, लवकरच उभारणार डबल डेकर फ्लायओव्हर

राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू; उच्चस्तरीय आढावा बैठकीत अहवाल सादर, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर; शेतकरी आंदोलनानंतर प्रकल्पात मोठे बदल, खर्च १ लाख कोटींवर

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी