ठाणे

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याची आ.राजेश पाटील यांची मागणी

बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे

प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ मधील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे, साचलेले पाणी, गाळ काढण्याचे काम त्वरित करा अन्यथा टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे. सदर पत्रात त्यांनी नमूद केले आहे की मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ हा पालघर जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणारा एकमेव महामार्ग आहे.

या महामार्गाला पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, विक्रमगड, तलासरी ही महत्त्वाची तालुके जोडलेली असल्याने बहुतांश नागरिक हे या मार्गावरून वसई- विरार शहर, मुंबई शहर, शहर, गुजरात या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येजा करीत असतात. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

तसेच महामार्गाच्या डिव्हायडर लगत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन मृत्यु झाला आहे.

नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी हटवली; युवकांच्या आंदोलनाला यश

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Nashik : आश्रमशाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू; मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध

आशियातील वर्चस्वासाठी आजपासून चुरस! Asia Cup 2025 स्पर्धेत भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, बघा सर्व सामन्यांचं वेळापत्रक