ठाणे

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू, कुत्राही दगावला

या दुर्घटनेत एकूण पाच जण ढीगाऱ्याखाली अडकले होते

प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही खचली होती. या दुर्घटनेत रविवारी तीन जणांची ढिगाऱ्याखालून काढत सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोन जण ढीगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा रविवार सकाळपासून शोध सुरु होता. अखेर २४ तासानंतर नरेश पालांडे ( ५६) व अलका महादेव पालांडे (९४) या दोघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एक मृतदेह रात्री १.२५ मिनिटांनी तर दुसरा शव सकाळी ६ वाजता आढळला असून या दुर्घटनेत बेसमेंट मध्ये कुत्र्याचा ही आढळला आहे.

शनिवार सकाळपासून मुंबईत पावसाची बॅटिंग सुरु आहे. अधूनमधून जोरदार सरी बरसत असून मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबईत पावसाची सुरुवात झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. रविवारी सकाळी ९.३३ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही तळ अधिक तीन मजली इमारत खचली. या दुर्घटनेत एकूण पाच जण ढीगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोघा अडकलेल्यांचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरु केला. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन