ठाणे

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू, कुत्राही दगावला

या दुर्घटनेत एकूण पाच जण ढीगाऱ्याखाली अडकले होते

प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही खचली होती. या दुर्घटनेत रविवारी तीन जणांची ढिगाऱ्याखालून काढत सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोन जण ढीगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा रविवार सकाळपासून शोध सुरु होता. अखेर २४ तासानंतर नरेश पालांडे ( ५६) व अलका महादेव पालांडे (९४) या दोघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एक मृतदेह रात्री १.२५ मिनिटांनी तर दुसरा शव सकाळी ६ वाजता आढळला असून या दुर्घटनेत बेसमेंट मध्ये कुत्र्याचा ही आढळला आहे.

शनिवार सकाळपासून मुंबईत पावसाची बॅटिंग सुरु आहे. अधूनमधून जोरदार सरी बरसत असून मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबईत पावसाची सुरुवात झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. रविवारी सकाळी ९.३३ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही तळ अधिक तीन मजली इमारत खचली. या दुर्घटनेत एकूण पाच जण ढीगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोघा अडकलेल्यांचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरु केला. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार