ठाणे

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावे एकत्र

वृत्तसंस्था

कर्जत तालुका ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. त्या तालुक्यातील शंभरहून अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांच्या भागातून वाहणाऱ्या चिल्हार नदी कोरडी असल्याने पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती दूर करण्यासाठी चिल्हार नदीजोड प्रकल्प सुरु करावा, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.

कर्जत तालुक्यात उल्हास नदी हि बारमाही वाहणारी नदी असून त्याच प्रमाणे उल्हास नदीला जोडणाऱ्या उपनद्या मध्ये पेजनदी आणि चिल्हार नदी यांचा समावेश होतो. पेज नदी सुद्धा बारमाही वाहणारी नदी आहे. तर चिल्हार नदी उन्हाळी मात्र कोरडी पडते. चिल्हार नदी सात ग्रामपंचायत मधून वाहते मोग्रज, टेंबरे, पाथरज, कशेळे, बोरीवली, पिंपलोळी, वाकस या सात ग्रामपंचायती मधील गावे आणि असंख्य वाड्या चिल्हार नदीच्या तीरावर आहेत. नदी कोरडी असल्याने उन्हाळयात त्या सर्व ग्रामपंचायत मधील गावात पाणीटंचाई असते. दुसरीकडे नदी कोरडी असल्याने त्या ठिकाणी पाणी नसल्याने पाण्या अभावी चिल्हार नदी काठच्या जीवसृष्टीला तसेच जनतेला उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा खुप त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे पाण्याअभावी या भागाचा विकास मंदावला आहे. चिल्हार नदी काठच्या गावांचा जीवन आणि विकास चिल्हार नदी चालू झाली, तर नदी परिसर कुशल मंगल होईल आणि या भागाचा विकास होईल त्याच बरोबर चिल्हार नदी बारमाही वाहणारी नदी झाल्यास त्याचा फायदा सात ग्रामपंचायती मधील गावांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

राहुल गांधी रायबरेलीतून, अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश