बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार संग्रहित छायाचित्र
ठाणे

बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार

बदलापूर घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित सामाजिक-शैक्षणिक देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुलींना आधार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूर घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित सामाजिक-शैक्षणिक देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुलींना आधार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च 'एक वेळची विशेष बाब' म्हणून पूर्णपणे शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीडित कुटुंबांना हा मोठा दिलासा मिळाला आहे तसेच यापुढे अशाच घटनांच्या बाबतीत शासनामार्फत कायमस्वरूपी मदतीबाबतदेखील शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारार्थ आहे. दरम्यान, सरकार हा सर्व खर्च आरटीईअंतर्गत शाळांना देणार आहे.

त्या निष्पाप मुलींना केवळ न्याय मिळवून देणे एवढेच आमचे कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हीदेखील आमची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या पालकांवर शिक्षणाचा आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही तातडीने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. दोन्ही लेकींनी कोणतीही चिंता न करता शिक्षण पूर्ण करावे, शासन त्यांच्या पाठीशी पालकाच्या भूमिकेतून खंबीरपणे उभे आहे.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

अमराठी रिक्षाचालकांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी कार्यशाळा सुरू; दहावीत प्रथम आलेली हिंदी भाषिक सपना साह देणार मराठीचे धडे

कराडच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ ते २२ मे उमेदवारी अर्ज; २१ जूनला मतदान, २३ जूनला मतमोजणी

Mumbai : 'वंदे भारत'मधील उद्घोषणा सुधारावी; विमान आणि रेल्वेतील उद्घोषणेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

'स्मार्ट' योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार अतिरिक्त अनुदान; दुर्बल ग्राहकांसाठी राज्य सरकारचे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

भिवंडीत एक्झॉस्ट फॅनवर मनपाची कारवाई होणार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक नियुक्त